You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
स्वामी रामानंदतीर्थ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ज्ञान प्रबोधिनीच्या अंबाजोगाई विस्तार केंद्राचे पूर्णवेळ कार्यकर्ते अमोल पाटणकर व ज्येष्ठ सदस्य श्री. वि. र. जोशी यांनी स्वामीजींचे कथारूप चरित्र लिहिले .ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव व स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष या जोड-निमित्ताने या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे.
स्वामी विवेकानंद - स्वामी रामतीर्थ - स्वामी रामानंदतीर्थ असा प्रेरणेचा एक प्रवाह आहे. स्वामी विवेकानंद - ज्ञान प्रबोधिनी असा प्रेरणेचा दुसरा प्रवाह आहे. या दोन्ही प्रवाहांमध्ये राष्ट्रधर्म' हा समान आशय आहे. त्यामुळेच १९७४ साली स्वामी रामतीर्थ जन्मशताब्दी साजरी करण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
सोलापूर व पुणे येथे स्वामी रामानंदतीर्थांचे वास्तव्य शिक्षणाच्या निमित्ताने होते. दोन्ही ठिकाणी ज्ञान प्रबोधिनीची केंद्रे आहेत. स्वामीजींनी हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत अध्यापन केले. हिप्परग्याच्या जवळच हराळीमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ग्रामीण केंद्र आहे. स्वामीजींच्या कामाचे केंद्र काही काळ अंबाजोगाईला होते. तिथेही ज्ञान प्रबोधिनीचे काम चालते. समान वैचारिक प्रेरणेबरोबरच समान भौगोलिक परिसर हा ही स्वामीजी आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्यामधील नात्याचा एक बंध आहे.
सत्ताकांक्षा न ठेवता केलेल्या...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book कथा स्वामी रामानंद तीर्थांच्या.